Skip to main content

मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत (Committee to form Fisheries Policy)

 मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत

महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी सदरचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आगामी पाच वर्षांमध्ये वीस हजार कोटीची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे धोरण आखण्यात आले आहे याच्या अंतर्गत नीलक्रांती हा कार्यक्रम राबवला जात आहे. किनारपट्टीच्या भागांमध्ये सागर मित्र तयार करणे आणि मत्स्य शेती उत्पादक कंपनी स्थापन करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा उपक्रम या योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये यापूर्वी खालीलप्रमाणे अधिनियम अस्तित्वात आहेत. भूजल जलाशय अधिनियम 1961, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था 1989, महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियम 2022 व इतर सर्व संबंधित घटक असा अभ्यास करून मत्स्य विकास धोरण निश्चित करण्यासाठी समिती प्रस्तावित करण्यात आली आहे.

मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

यामध्ये भूजल व सागरी जिल्ह्यातील विधानसभा व विधान परिषद सदस्य समाविष्ट असतील. (महाराष्ट्रातील कोळी बांधव व मत्स्य व्यवसायाशी निगडित नागरिक हे एकाच मतदारसंघात राहत नसल्याने व विखुरले स्वरूपात असल्याने ही तरतूद अतिशय महत्त्वाची आहे).

महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मंत्रालयातील मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव, केंद्रीय मत्स्यकीय अनुसंधान संस्था सीआयएफइ चे वैज्ञानिक, सागरी व भूजल जिल्ह्यातील सहकारी मच्छीमार संस्थेचे प्रतिनिधी, केंद्रीय समुद्री मत्स्यकीय अनुसंधान संस्था सीएम एफ आर आय यांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांचे प्रतिनिधी,

तसेच मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील सेवाभावी संस्था म्हणजेच एनजीओ चे प्रतिनिधी यांचा समावेश या समितीमध्ये करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सह आयुक्त मत्स्य व्यवसाय सागरी हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.


या समितीची कामे पुढीलप्रमाणे राहतील.
◦ विविध राज्यातील खारे निमखारे व गोडे पाणी यासंदर्भात असणाऱ्या योजनांचे अध्ययन करून महाराष्ट्र राज्यासाठी योजनेचे प्रारूप तयार करणे
◦ मत्स्य विकासाच्या अनुषंगाने पर्यावरणामध्ये होणारे बदल व संतुलन राखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना सुचवणे
◦ दुर्मिळ मत्स्य प्रजातींचे संवर्धन व संरक्षण कशा प्रकारे करता येईल याबाबत उपाययोजना सुचवणे
◦ पारंपारिक मासेमारी आणि त्यावर अवलंबून असलेले मच्छिमार यांची उपजीविकेबद्दलची साधनांची उपायोजना सुचवणे
◦ मासेमारी करिता शीतगृह वाहतूक चैन मच्छिमार व त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी व सामाजिक सुरक्षेसाठी उपाययोजना सुचवणे उदाहरणार्थ किसान क्रेडिट कार्ड
◦ जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या 20000 वरून अधिक जलाशयांचा मत्स्य विकास करण्याच्या दृष्टिकोनातून उपायोजना सुचवणे, शेततळ्यांचा मत्स्य उत्पादन वाढीसाठी उपाययोजन करणे आणि शेत तिथे मत्स्यतळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे
◦ समाविष्ट शैक्षणिक व केंद्रीय संस्था यांच्याबरोबर करार करून राज्यातील मत्स्य प्रजातींचे उत्पादन कसे वाढवता येईल याबाबत उपाययोजना करावी
◦ सार्वजनिक / खाजगी भागीदारीतून जेट्टी व बंदरे यांचा विकास करणे याबाबत उपाययोजना

मत्स्यव्यवसाय विभागाचे सर्वांकष धोरण एकत्रितरीत्या अस्तित्वात येण्यासाठी या समितीमार्फत भरीव कार्य केले जाईल अशी अपेक्षा बाळगूया.






Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र राज्यातील नागरी व शहरी क्षेत्राच्या लगत वाहणाऱ्या अधिसूचित नद्यांची वहन क्षमता पुनरःस्थापित करण्याचे धोरण

महाराष्ट्र राज्यातील नागरी व शहरी क्षेत्राच्या लगत वाहणाऱ्या अधिसूचित नद्यांची वहन क्षमता पुनरःस्थापित करण्याचे धोरण हा शासन निर्णय जलसंपदा विभागाने दिनांक 25 जुलै 2023 रोजी निर्गमित केला आहे. जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरणीय बदल यामुळे पर्जन्यमानावरती जो परिणाम होतोय त्याला या शासन निर्णयाने अधोरेखित केले आहे. यानुसार पर्जन्याचे प्रमाण विखुरलेल्या स्वरूपात न होता केंद्रित स्वरूपात व कमी कालावधीत ढगफुटीसदृश्य पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे, असे नमूद केले आहे. परिणामी अशा पर्जन्यवृष्टीमुळे शहरी भागात पूर परिस्थिती निर्माण होते व जीवित व वित्तहानी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये सन 2005 ते 2022 इतक्या मोठ्या कालावधी मधील पूर परिस्थितीचा विचार केला आहे. याची कारणमीमांसा करताना असे लक्षात येते की पावसाळ्यात पुराच्या पाण्यासोबत आजूबाजूच्या डोंगरातील माती, दगड, गोटे, रेती असे अनेक पदार्थ वाहून येतात आणि नदीच्या सखल भागामध्ये जमा होतात. तसेच नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात होणारे शहरीकरण,बांधकाम,वृक्षतोड ,रस्ते व रेल्वे वाहतूक इत्यादी कामांसाठी केलेला भराव व खोदकाम यामुळे आजूबाजूचा गाळ पाण्या...

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना आता कृषी व पंचायत विभागामार्फत राबविण्याबाबत

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना आता कृषी व पंचायत विभागामार्फत राबविण्याबाबत आत्तापर्यंत राज्यात साधारणता पंधरा हजार एकर तुती लागवड करण्यात आली असून विविध ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची मागणी आहे. निधी उपलब्ध असूनही ही योजना राज्यात पाहिजे त्या प्रमाणात राबविण्यात येत नसल्याने आता रेशीम उद्योग विकास योजना रेशीम संचालनालयासह कृषी विभाग व पंचायत विभागामार्फत राबवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तुती लागवडीसाठी कमीत कमी एक एकर व जास्तीत जास्त पाच एकर प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा राहील. तसेच लागवडी क्षेत्र कितीही असले तरी प्रत्येक लाभार्थ्याला 50 फूट लांबीचे व 22 फूट रुंदीचे कीटक संगोपन गृह अनुज्ञेय राहील. लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक ठिकाणी अर्ज पेटी ठेवण्यात येईल आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात येईल अर्ज करताना शेतकऱ्यांनी त्यांना कोणत्या यंत्रणे कडून म्हणजेच ग्रामपंचायत किंवा कृषी विभाग या दोन पैकी कोणाकडून योजना राबवण्यात रस आहे ते स्पष्टपणे नमूद करावे. असे अर्ज प्राप्त झाल्यानंतर ...